दि. १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईच्या झालेल्या स्फोटाची कहाणी – भाग तिसरा (३/३)

लेखाच्या दुसऱ्या भागात आपण वाचलं की,

२४ फेब्रुवारी १९४४ रोजी इंग्लंडहून निघालेलंएस. एस. फोर्ट स्टांयकीनजहाज व्हाया कराची मुंबई बंदरात पोहोचलं होतं. १२ एप्रिल १९४४ या दिवशी सकाळी साधारण ११.३० वाजता, जहाज त्याला मिळालेल्या आदेशानुसार व्हिक्टोरिया डॉकचा धक्का क्रमांक (Berth No. 1) येथे लागलं. परंतु स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान बोटी आणि बार्ज १३ एप्रिलच्या दुपारपर्यंत आलेल्याच नव्हत्या आणि तो धोकादायक माल तसाच बोटीत पडून होता.

पुढे जी काही घटना घडायची होती, त्याची ही नांदी होती..!

पुढे….

शेवटी १३ एप्रिलला त्या दिवशी दुपारनंतर स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या त्या बोटी अवतरल्या. बोटी आल्या खऱ्या, परंतु त्या बोटींमध्ये समुद्राच्या बाजूने स्फोटकं उतरवून घेण्याऐवजी, बोटीवरील मजुरांच्या टोळ्या, बोटीवरील इमारती लाकडाचे मोठे ओंडके, विविध धातूचं भंगार उतरवून घेण्याच्या मागे लागलं. भंगार उतरवण्यासाठी आणलेली, क्रेन भांगाराचं वजन उचलण्यास असमर्थ होती. म्हणून नवीन, मोठ्या क्षमतेची क्रेन आणायची ठरलं, परंतु ती दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ एप्रिलच्या सकाळी येणार होती. आता क्रेनच नाही म्हटल्यावर, बोटीवर माल तसाच पडून राहिला आणि तो दिवसही फुकट गेला.

१४ अप्रीलचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया डॉक्मध्ये फोर्ट स्टायकीनसारख्याच आणखी १० बोटी लागलेल्या होत्या. शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये ९ बोटी लागलेल्या होत्या. त्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासूनच ह्या सर्व बोटींनी विविध ठिकाणांहून वाहून आणलेला विविध प्रकारचा माल उतरवून घेण्याची एकाच धांदल उडालेली होती. फोर्ट स्टायकीनवरचं सामानही उतरवून घेणं चालू होत. दुपारचे १२.३० वाजले आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली. माल उतरवून घेणारे हमाल आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या मुकादमानी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि ते धक्क्यावरच जेवण घेऊन लागले. ही नेहेमीचीच बाब होती. १५-२० मिनिटात जेवून, ते तिथेच थोडीशी सावली पाहून लवंडले. अंगमेहेनत करणाऱ्या कामगारांना दुपारची अर्ध्या तासाची झोप आवश्यक असते. हे देखील रुटीन होतं.

एप्रिल महिन्यातला मुंबईतला उकाडा. उष्णतेने घाम अंगभर भरून राहिला होता. फोर्ट स्टायकीनपासून चारपाच जहाज सोडून, पुढे काही अंतरावर असलेल्या एका जहाजातले दोन अधिकारी, वारा खात त्यांच्या जहाजच्या डेकवर उभे होते. त्यांचाही जेवण नुकताच आटोपलं होतं आणि ते गप्पा मारायला डेकवर आले होते. बोलता बोलता आजूबाजूच्या परिसरावर सहज म्हणून नजर फिरवीत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष फोर्ट स्टायकीनवर गेल. फोर्ट स्टायकीनच्या दोन क्रमांकाच्या कप्प्यातून धूर येतोय, असं त्यांना वाटलं. त्यांनी अधिक काळजीपूर्वक पुन्हा तिकडे पाहिलं, पण आता धूर दिसत नव्हता. कदाचित असा भास झला असावा,म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपल्या गप्पा सुरूच ठेवल्या.

दुपारच्या १२.४५ च्या दरम्यान, धक्क्यावर उभय असलेल्या पोलीसानीही फोर्ट स्टायकीनच्या एका कप्प्यातून धूर येताना पहिला होता. परंतु बोटीवरची माणसं काय ते बघून घेतील, म्हणून त्यांनीही तिकडे दुर्लक्ष केलं. अशा लहान-सहान आगी तर लागतच असत. त्यापैकीच ही एक असावी, असं त्यांना वाटलं असावं. अशा लहान आगी विझवण्याची प्रत्येक जहाजावर व्यवस्था असते आणि त्या विझाव्ल्याही जातात. त्यामुळे त्या पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नसावं.

दुपारचा दीड वाजला. जेवणाची सुट्टी संपली आणि कामगारांनी पुन्हा काम सुरु केलं. फोर्ट स्टायकीनवरचं, काल क्रेन न आल्यामुळे भंगार उतरवायचं काम तसंच राहिलं होतं, ते करायला घेतलं. नव्याने आलेल्या मोठ्या क्षमतेच्या क्रेनचा हुक बोटीवर सोडण्यात आला, पण तो त्या भंगार ठेवलेल्या दोन नंबरच्या कप्प्यात जाईनासा झाला. तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर, तो एकदाचा दोन नंबरच्या कप्प्याच्या आत पोहोचला. हुकला भंगाराचा गठ्ठा अडकवला आणि क्रेनच्या चालकाला, हुक वर घेण्याची सूचना केली. जसा तो भंगाराचा गठ्ठा क्रेनच्या हुकला अडकून कप्प्यातून वर आला, त्याबरोबर पांढऱ्या धुराचा एक मोठा लोट दोन नंबरच्या कप्प्यातून भसकन वर आला. प्रथम पांढरा आणि विरळ असलेला तो धूर, हळूहळू दाट काळपट होऊन बाहेर येऊ लागला. दोन क्रमांकाच्या नंबरच्या कप्प्यात, खाली कुठेतरी आग धुमसत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं.

लगेच बोटीवरचा फायर अलार्म वाजवला गेला. बोटीवर असलेल्या आग विझवण्याचे तीन पंप सुरु करून, दोन नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याचबरोबर, आग नेमकी कुठे लागली आहे ते तपासण्यासाठी बोटीवरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करू लागला, परंतु धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. एव्हाना बोटीवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढचा धोका लक्षात येऊ लागला. आग विझवण्यात दंग असलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि धक्क्यावरील इतर फायरमनना, बोटीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आहेत हे माहित नव्हतं. म्हणून ते धूर येत असलेल्या ठिकाणी पाणी फवारण्याचा कामात लागले होते. तरीही आग म्हटल्यावर माणूस घाबरतोच. त्याप्रमाणे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल बोटीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. आणि तेवढ्यातच कुणीतरी ‘फायSSSर’ म्हणून जोरात ओरडलं. एकाच धावपळ सुरु झाली. जो तो बोटीपासून लांब पाळण्याच्या मागे लागला.

बोटीपासून दूर पळणारी माणसं..!

बोटीच्या आत कुठेतरी लागलेली आग बोटीवरच्या पंपाने विझत नाही, हे लक्षात आल्यावर धक्क्यावर असलेले मोठ्या क्षमतेचे पंपं सुरु करण्यात आले. पुढची ४५ मिनिटं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. तरीही आग आटोक्यात येत नाही हे पाहून, मुंबई फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला. फायर ब्रिगेडच्या गाड्या दुपारी २.२५ मिनिटांनी पोहोचल्या. गोदीमध्ये तशा साधारण आगी लागतच असत. त्यापैकीच ही एक असावी, म्हणून फायर ब्रिगेडने फक्त दोनच गाड्या पाठवल्या होत्या. नेमकी किती मोठी आग लागली आहे आणि बोटीवर प्रचंड प्रमाणत स्फोटकं आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

अजून आग दिसत नव्हती, मात्र धूर येत होता. धुराचं प्रमाण आणि दाटपणा वाढत चालला होता. फोर्ट स्टायकीनच्या डेकवर, बोटीचा फर्स्ट ऑफिसर हेन्डरसन आग विझावणाऱ्या फायरमनशी, आग नेमकी कुठे लागली आहे त्याचा पहिला शोध घ्यावा म्हणून वाद घालत होता. आग नेमकी कुठे लागली आहे, याची काहीच माहिती नसताना, तो फायरमन आग नक्की विझेल याची खात्री देत होता. आत किती मोठा बॉम्ब आहे, याची त्याला कल्पना नव्हती,

दोन नंबरच्या कप्प्यात सर्वात तळाला सोनं होतं. त्याच्यावर दारूगोळ्याचे पेटारे आणि त्याच्याही वर कापसाच्या दाबून भरण्यात आल्या होत्या. हेन्डरसनला कापसाच्या गासड्यांना आग लागली असेल तर पुढचा विनाश अटळ आहे, हे ध्यानात आलं आणि म्हणून स्वत:च दोन नंबरच्या कप्प्यात आगीचा शोध घेण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. तो आत उतरला.

मुंबई फायर ब्रिगेडला दुसरा कॉल २ वाजून ३० मिनिटांनी केला गेला आणि मग मोठी आग लागल्याची शंका येऊन, डझनभर बंब पाठवून दिले. एकाचवेळी पाण्याचे २०-२५ पंप दोन नंबरच्या कप्प्यात पाणी मारू लागले. आगीच्या वर्दीमुळे जहाजावर उडालेल्या धांदलीत, हेन्डरसन कप्प्याच्या आत आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. तासाभरापूर्वी दोन नंबरच्या कप्प्यात लागलेली आग आता तिथेच मर्यादित राहिली नव्हती. ती खालच्या बाजूने आजूबाजूला झपाट्याने पसरत चालली होती. आणि पाणी तर फक्त दोन नंबरच्याच कप्प्यात फवारलं जात होतं. कापसाच्या गासड्यांना लागलेली आग, हळूहळू स्फोटकांच्या साठ्यापर्यंत पोहोचू लागली होती. आग विझण्याची शक्यता निर्माण झालेल्या धुरात विरून जात होती.

डेकवर चालेली गडबड लक्षात येऊन, बोटीचं इंजिन खोलून बसलेला चीफ ऑफिसर अलेक्स गो डेकवर आला. डेक धुराने आणि पाण्याने भरून गेल्याचं पाहून, झाली गोष्ट त्याच्या ध्यानात आली. कॅप्टन नायस्मिथ अलेक्सपाशी आल आणि, दोन नंबरच्या कप्प्यात आग लागल्याच वर्तमान त्याला दिलं. Fire & Salvage Department चे कमांडर जे. एच. लॉंगमायर (J. H. Longmire) आणि फायर ब्रिगेडचे एन. कुम्ब्स (N. Coombs) हे दोन अधिकारी त्या दोघांपाशी आले आणि दोन नंबरचा पूर्ण कप्पा पाण्याने भरून टाकता येईल का याची विचारणा केली. मात्र, बोटीला नोन-रिटर्न व्होल्व्स लावलेले असल्याने, बोटीतून पाणी बाहेर फेकता येईल, मात्र आत नेता येणार नाही, असं अलेक्सने त्यांना सांगितलं. म्हणजे हा ही उपाय करता येण्यासारखा नव्हता.

कॅप्टन नायस्मिथ आणि इतर अधिकाऱ्यांची उपायांसाठी चर्चा सुरू असतानाच Ordnance Service (Army) खात्याचै अधिकारी मेजर ओब्रास्ट ( Major Obrast) जहाजावर आले. बोटीतून येणारा धूर पाहून त्यांनी नायस्मिथकडे स्टोवेज प्लान मागितला. नेमक्या मोठ्या प्रमाणावर धूर येत असलेल्या दोन नंहरच्या कप्प्यातच स्फोटकांचा मोठा साठा असल्याचं पाहून, त्याने जहाजाला भोक पडून, त्यातून जहाजाच्या आत पाणी जाऊ देऊन जहाज बुडववणं शक्य आहे का, त्याची विचारणा केली. पण ते ही शक्य नव्हतं. कारण, व्हिक्टोरिया डॉकमधील ज्या बर्थ क्रमांक १ येथे जहाज उभं होतं, त्या ठिकाणी संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढी पाण्याची खोली नव्हती. शिवाय, संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढं पाणी जहाजात भरण्यासाठी एक भोक करून काम भागणार नव्हतं. अनेक भोकं करावी लागणार होती. तेवढा वेळ हातात नव्हता. परत, भोक पडण्यासाठी लागणारी मेटल कटींग मशिनरी वापरताना ठिणग्या पडणारच होत्या. त्या तर जास्त धोकादायक होतं. उद्याचं मरण आजच आणण्यासारखंच होतं ते. त्यामुळे रोगापेक्षा हा जालीम असणारा हा उपायही बाद करण्यात आला.

स्टोवेज प्लान

एव्हाना व्हिक्टोरीया डॉक्सचे जनरल मॅनेजर कर्नल सॅडलर (Colonel Sadler) बोटीवर पोहोचले. आता एकाच शेवटचा उपाय राहिला. जहाज धक्क्यापासून थोडं लांब, दूर समुद्रात सुरक्षित अंतरावर घेऊन जावं. पण बोटीचं इंजिन खोलून ठेवलेलं होतं. जहाज स्वतःच्या इंजिनाच्या मदतीशिवाय एक इंचही हलू शकत नव्हतं. बोटीला बंदरापासून लांब समुद्रात न्यायचं असेल तर ‘टग्स’ लागणार होते. ते ही मागवण्यात आले. आणखी एक उपाय होता. जहाजाच्या डेकवरून धक्क्यावर जहाज बांधण्यासाठी असलेल्या मजबूत पोलादी खांबाला दोरखंडाने बांधून, जहाजाला कुशीवर पाडून त्यात पाणी भरू द्यायचं. त्यामुळे ज्या कुठल्या ठिकाणी आग पसरली असेल, तिथपर्यंत पाणी पोहोचून होऊ शकणारं नुकसान टाळता येऊ शकेल. पण तिथे तर पाण्याला खोलीच नव्हती, जहाज आडवं पाडून काहीच उपयोग होणार नव्हता.

जहाजावर इतके जबाबदार अधिकारी उपस्थित असुनही त्यांच्यात, त्या क्षणाला नेमकं काय करावं, यावर निर्णय होत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी एकाने नियंत्रण हातात घेऊन निर्माण झालेली गंभिर परिस्थिती हाताळणं आवश्यक होतं. परंतु तसं न होता, त्यांच्यापैकी प्रत्येकजण वेगळा विचार करत होता. कॅप्टन नायस्मिथला आपलं जहाज वाचवायचं होतं. डॉक्स मॅनेजर सॅडलरला धक्क्याचं नुकसान व्हायला नको होतं. तर फायर ब्रिगेडच्या कुम्ब्सना जहाजाला लागलेली आग जहाज धक्क्यावर असतानाच विझवली जाऊ शकेल असं वाटत होतं.

कुणाला काहीच उपाय सुचत नव्हता. आग क्षणाक्षणाला पसरत चालली होती. नायस्मिथ, अलेक्स आणि फायर विभागाचे अधिकारी उपायांवर चर्चा करीत असतानाच, फोर्ट स्टायकीनवरचा एक अधिकारी धावत त्यांच्यापाशी आला आणि जहाजाचा धक्क्याच्या बाजूकडील एक भाग आतील उष्णतेमुळे वितळायला लागल्याची बातमी त्याने दिली. आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हत.

एव्हाना दुपारचे २.५८ झाले होते. जहाजच्या आतल्या बाजूला आग वेगाने पसरत चालली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून जहाजाच्या पत्र्यांना भोकं पाडून त्यात पाणी भरू द्यायचा, हा सुरुवातीला सुचलेला उपाय करून पहायचं सर्वांनी एकमताने ठरवलं. तो यशस्वी होईल की नाही, याची काहीच शाश्वती नव्हती; पण काही इलाजच उरला नव्हता. मशिनरी बोलावण्यात आली. पत्रा कापायची ती अवजड मशिन आली आणि बॅड लक, ती मशिन काही केल्या चालूच होईना. म्हणजे हा उपायही सरला.

एव्हाना दुपारचे सवा तीन वाजले होते. आता पुढे काय होणार, याची वाट पाहत असतानाच, जहाजातून घट्ट कल्पाद धुराचा मोठा ढग बाहेर आला आणि त्यासोबत पेटत्या कापसाच्या लडी आकाशात उडू लागल्या. हा इशारा होता, आतल्या स्फोटकांनी आग पकडल्याचा. प्रचंड प्रमाणात झालेल्या धुरामुळे श्वास घेणं अवघड होऊ लागलं आणि परिणामी जवळपास २४-२५ पंपांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करणारे फायरमन आणि इतरजन अपोआप जहाजापासून दूर जाऊ लागले.

आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं. आत पुढे काय होतं, याची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हाती होत. दुपारचे ३ वाजून ५० मिनिटं झाली आणि आणि सबंध जहाज व्यापून राहील इतका मोठा आगीच्या लखलखत्या ज्वाळांचा लोळ जहाजातून बाहेर पडला. तो जसा बेहेर पडला, तसाच क्षणात दिसेनासाही झाला. आत स्फोट होण अटळ असल्याच, कॅप्टन नायस्मिथच्या लक्षात आल. आता करण्यासारखं काहीच शिल्लक उरलं नव्हतं. त्याने जहाजावरच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना, त्वरित जहाज सोडण्याचे आदेश दिले आणि तो ही धक्क्यावरच्या एका इमारतीच्या आश्रयाला निघून गेला. आग विझवण्यास आलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी-अधिकारीही मागे सरले.

गोदीच्या आसपासच्या आणि बाहेरच्या परिसरात लोकांचे नेहेमीचे व्यवहार सुरु होते. व्हिक्टोरिया गोदीत आग लागली आहे, हे त्यांना एव्हाना समजलं होतं, गोदीत आगी लागणं ही काही नवीन घटना नव्हती. तशा लहान मोठ्या आगी लागणं आणि त्या विझाव्ल्याही जाणं नित्याचंच होतं  ही तशीच एखादी आग असावी, असं त्यांना वाटलं. व्हिक्टोरिया आणि शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये नांगरलेल्या इतर जहाजांवरचे खलाशी ते दृश्य पाहत होते. गेली पाच-एक वर्ष युद्ध साहित्यांनी भरलेल्या बोटी, खुल्या समुद्रात शत्रू बोटींनी केलेल्या टोर्पेडोच्या हल्ल्यात, आगी लागून नष्ट झालेल्या त्यांनी पहिल्या होत्या. त्यामुळे त्यानाही त्याचं काहीच वाटलं नव्हतं. नेहेमीप्रमाणे त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपापल्या कामात लक्ष घातलं. फोर्ट स्टायकिनवर खच्चून भरलेली स्फोटकं आहेत, याची, अर्थातच, त्यांना कलपना नव्हती.

दुपारचे चार वाजून गेले. घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता. दुपारचे ४.०६ मिनिटं झाली, आणि कानाचे पडदे फाटवणारा प्रचंड मोठा आवाज करत बोटीवरील स्फोटकांचा स्फोट झाला. स्फोट होताच फोर्ट स्टायकिनचे दोन तुकडे झाले. एक तुकडा समुद्रातच राहिला, तर जवळपास १०० टन वजनाचा दुसरा तुकडा उडून थेट अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीवर जाऊन पडला. धक्क्यावर असलेल्या इमारती जमीनदोस्त झाल्या. पाण्याचे पाईप्स फुटले. गटारं तुटली. आग विझवण्यासाठी आलेले बंब लांब उडाले. स्फोटामुळे समुद्रात प्रचंड मोठी लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत आजूबाजूची १०-१२जहाजं बुडाली. फोर्ट स्टायकिनच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका तीन हजार टनी मालवाहू जहाजाचे तर अनेक तुकडे होऊन, ते गोदीच्या परिसरात विखरून पडले. त्या तुकड्यांखाली कित्येक माणसं मेली. इमारती पडल्या. अनेक जहाजांना आगी लागल्या. गोदीच्या परिसरातल्या आकाशात सर्वत्र काळाकुट्ट धूर भरून राहिला.

काय होतंय ते कुणाला समजण्याच्या आताच, ४ वाजून २० मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. हा स्फोटाची तीव्रता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. ह्या स्फोटाबरोबर बोटीतला कापूस जळून उंच आकाशात उडाला आणि जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात जणू काही पेटत्या कापसाचा पाऊस पडू लागला. त्या पेटत्या कापसामुळे गोदीतल्या आणि गोदीच्या बाहेरच्या इमारतींना आगी लागल्या. जपानने मुंबईवर आक्रमण केल ह्या समजुतीने लोक घर-दर सोडून आपापला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. केवळ कापूसच नव्हे, तर जहाजात असलेल्या भंगाराचे तुकडेही आकाशात उडून वितळलेल्या स्वरुपात पडू लागले. त्या तप्त पोलादी तुकड्यांखाली सापडून कित्येक लोक मरण पावले. गोदीचा परिसर तर संपूर्ण बेचिराख झाला होता. गोदीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच्या एका पारशाच्या घराचं छप्पर फाडून धुरामुळे काळवंडलेला धातूचा एक मोठा तुकडा पडला. तो तुकडा जर डोक्यावर पडला असता तर, कवटी फुटून आपला जीव गेला असता, ह्या विचाराने हादरलेल्या तो पारशी, थिजलेल्या नजरेने जमिनीवर पडलेल्या त्या तुकड्याकडे काही क्षण पाहत राहिला. काही काळाने भानावर आल्यावर, त्याच्या घरात पडलेला तो धातूचा मोठा तुकडा लोखंडाचा नसून, सोन्याचा आहे हे लक्षात आले. २८ पाउंड वजनाची सोन्याची वीट होती ती.

स्फोटानंतर फोर्ट स्टायकिनच्या पंख्याचे (प्रॉपेलर- propeller. पाणी कापण्यासाठी बोटीच्या तळाशी असलेला मोठा पंखा) तुकडे होऊन आकाशात भिरकावले गेले. त्यातील एक तुकडा क्रॉफर्ड मार्केटनजीकच्या सेंट झेवियर शाळेच्या आवारात पडला होता. तो तुकडा त्या शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी पडला होता, त्याच ठिकाणी अजूनही जपून ठेवण्यात आला आहे.

सेंट झेविअर शाळेच्या पआवारात जाऊन पडलेला बोटीच्या प्रॉपेलरचा तुकडा

मुंबईतली सर्व फायर इंजिन्स आणि अँम्ब्युलन्स गोदीमध्ये आणण्यात आल्या. ह्या अँम्ब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे, ह्या गाड्या स्त्रिया चालवत होत्या. अख्खी मुंबई एकोप्याचं दर्शन घडवीत रस्त्यावर उतरली होती. केवळ गोदीमधेच नव्हे, तर मस्जिद, भायखळा, माजगाव इत्यादी गोदीपासून जवळच्या परिसरातही लोकांना मदतीची गरज होती. पोलीस होतेच, परंतु स्वत:चं दु:ख बाजूला सारून लोकही इतराच्या मदतीसाठी पुढे आले होते. . मुंबईचे गव्हर्नर सर जोन कोलव्हील यांनी जातीने गोदी परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने मदतीच्या सूचना दिल्या.

ह्या स्फोटामुळे, गोदीच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तर तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणीपुरवठा विस्कळीत झाला गोदीच्या परिसरातील स्फोटामुळे मोडकळीला आलेली अनेक गोदामे रिकामी करण्याच्या कामासाठी लष्कराची अख्खी पलटण जुंपली होती. काळबादेवी, मस्जिद, मोहम्मद अली मार्ग इत्यादी ठिकाणी असलेल्या इमार्तीतील व्यापाऱ्यांची कार्यालयं जमीन दोस्त झाली होती. त्यात असलेल्या त्यांच्या हिशोबाच्या चोपड्या, रोकड, सोनं-नाणं यांची जपणूक करणं आणि ज्याची त्याची ओळख पटवून देण्याचं काम मोठाच होतं. पोलिसांनी ते काम लीलया पेललं हे काम पुढे अनेक दिवस सुरु होत. मस्जिद येथील इथल्या बरोडा स्ट्रीट ( आताचा के. एन. पाटील रोड) इथल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे ८०० लहान –मोठे हिरे सापडले. त्यातला एक हिरा सुमारे १० हजार रुपये किमतीचा होता. ह्या हिऱ्यांचे मालक शा. देवजी रतनसी असल्याचं शोधून काढून ते हिरे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. एका इमारतीत्च्या ढिगाऱ्यात ५५ हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याही ज्याच्या होत्या त्याची ओळख पटवून त्याला परत देण्यात आल्या. इमारतींना लागलेल्या आगीत किती रुपये भस्मसात झाले, त्याचा कधीच पत्ता लागू शकला नाही. अनेक अर्धवट जळलेल्या नोटा व्यापारी भागात पसरलेल्या दिसून येत होत्या. ह्या स्फोटामुळे शहरात लागलेल्या आगींमध्ये सुमारे ५५ हजार टन अनन्धान्य आगीत स्वाहा झाले. लोकांवर उपासमारीची पाळी आली होती.

हिरे सापडल्याची बातमी.

स्फोटामुळे कोसळलेल्या इमारतीत ते ढिगारे हलवून ती जागा मोकळी करण्याचं काम, म्युनिसिपालीटीचे सिटी इंजिनिअर मोडक यांच्या देखरेखीखाली चालू होते. अर्धवट कोसळलेल्या इमारती पडण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या आवाजांमुळे, मुंबईकर घाबरेघुबरे होत होते. त्यातच बोटीत झालेल्या स्फोटानंतर, न उडालेले बॉम्ब्स आणि बंदुकीच्या गोळ्याही सर्वत्र पसरल्या होत्या. इमरात अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना, त्याच्या दगड विटा त्यावरच्या काही बॉम्ब्सवर पडून स्फोट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळेही घबराट पसरली होती. अशा स्फोटांचे आवाज आले तरी घाबरू नका, असं आवाहन मुनिसिपालीटीला करावे लागत होते. पडलेल्या घरांचा राडा-रोडा वरळीला रेसकोर्सच्या परिसरात नेऊन टाकण्यात येत होते. पडझड झालेल्या इमारतीतील भाडेकरू अक्षरक्ष: रस्त्यावर आले होते. अनेक लोक बेघर झाले होते. तर अनेक बालकं अनाथ..!

ह्यात नेहेमीप्रमाणे संकटात संधी शोधणारे लोकही आपले हात धुवून घेत होते. कोसळलेल्या घरातून चीजवस्तू, पैसे चोरण्याचं प्रमाण वाढलं होत. पोलिसांना ते नवीनच काम लागलं होत. विमा कंपन्यांनी भरपाई देताना नेहेमीप्रमाणे हात वर केले होते.

पुढचे सतत तीन दिवस व्हिक्टोरिया गोदितली आग विझवण्याचं काम सुरु होत. गोदीतल्या जवळपास सर्वच इमारती नष्ट झाल्या होत्या. ह्या स्फोटामुळे अदमासे २ कोटी पौंडाची मालमत्ता नष्ट झाली असावी, असा अंदाज लावला गेला. माणसं किती मेली, त्याचा कोणताही नक्की आकडा उपलब्ध नाही. काही माणसं पार नाहीशीच झाली. त्यांची प्रेतही मिळाली नाहीत. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात तरंगणारी प्रेतं सापडत होती. तरीही एक अंदाज म्हणून ५०० ते ७०० माणसं ह्या स्फोटात मेली असावीत. बोटीवरचा कुणीही अधिकारी-कर्मचारी वाचला नव्हता.

एस. एस. फोर्ट स्टायकिन बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ याने घेतलेल्या हरकतीनंतरही विध्वंसक स्फोटकाबरोबरच कापूस, तेल इत्यादी शीघ्र ज्वालाग्राही वस्तू जहाजावर लादण्यात आल्या होत्या. कॅप्टन नायस्मिथ या स्फोटात मरण पावला. त्याचं प्रेतही सापडलं नाही. जहाज वाचवण्यासाठी त्याने अखेरपर्यंत केलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून त्याला मरणोपरांत गौरवण्यात आलं. जहाजातून बाहेर पडणारा धूर नेमका कुठून येतो हे पाहण्यासाठी, जीवाची परवा न करता, जहाजाच्या समान कक्षात शिरलेला जहाजाचा फर्स्ट ऑफिसर हेन्डरसन यालाही त्याने दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल गौरवण्यात आलं होतं.

फोर्ट स्टायकिनला आग लागल्यानंतर बोटीवर गेलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सॅडलर या स्फोटात मरण पावले. त्यांच्यासोबतच डॉक आणि रेल्वे मॅनेजर जॉन निकोलसन, डॉक मास्टर मार्तेझ, डेप्युटी मॅनेजर जॅक्स, मि. स्कॅली, सुपरींटेडेंट सेल्व्हेजकोर, फोर्ट फायर स्टेशनचे प्रमुख रुस्तम पालमकोट हे अधिकारी जागीच मरण पावले. त्यांच्या मृत शरीराचाही पत्ता लागला नाही.

या स्फोटात फायर ब्रिगेडचे हेरॉल्ड पाल्मर, रोबर्ट अन्द्र्युज, आर्थर रेनोल्ड्स इत्यादी १३ अधिकारी आणि ५३ कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यापैकी अनेकांची प्रेतं सापडली नाहीत. ७१ जवान जखमी झाले होते. स्फोटात आपलं बलिदान देणाऱ्या फायर ब्रिगेडच्या ह्या अधिकारी आणि जवानांच्या मृत्यार्थ, दर वर्षी १४ एप्रिलला त्यांना मानवंदना दिली जाते आणि १४ एप्रिल ते २० एप्रिल हा आठवडा ‘अग्नी सुरक्षा साप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

फायर ब्रिगेड जवान शहिद बातमी

स्फोटात शहिद झालेल्या अग्नीशमन दलातील जवानांची यादी

दिनांक १४ एप्रिल १९४४ या दिवशी दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान झालेले दोन महाप्रचंड स्फोट होते, ज्यांची नोंद दोन-एक हजार किलोमीटर अंतरावरच्या सिमला वेधशाळेच्या भूकंपमापन यंत्रावर झाली होती. जगात तेवढ्या क्षमतेचा स्फोट तोवर झालेला नव्हता. मुंबईच्या गोदीत झालेल्या ह्या स्फोटाला मागे टाकणारा नंतरचा स्फोट, अमेरिकेने हिरोशिमा- आणि नागासकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचा झाला होता. ह्या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच शिल्लक उरले नव्हते. वर स्फोटाचं जे वर्णन केलं आहे, ते अनेकांनी अनेकांकडून आणि सरकारी कागदपत्रांवरून माहिती घेऊन नंतर केलेलं आहे.

दुसरं महायुद्ध सुरु होतं. अगदी निकरावर आलं होतं. अशा परिस्थितीत झाल्या परिस्थितीतून मार्ग काढणं आवश्यक होत. स्फोट झाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून सैन्याने गोडीचा ताबा घेतला आणि जे जे नष्ट झालं होतं, ते ते नव्याने उभारण्याचं कार्य जोमाने सुरु केल. सतत सहासात महिने अविश्रांत कष्ट करून व्हिक्टोरिया आणि प्रिन्सेस गोदीचं कामकाज पूर्वपदावर आणलं गेलं.

गोदीत झालेल्या ह्या स्फोटाची आठवण म्हणून, स्फोटामुळे उंच आकाशात उडालेल्या सोन्याच्या विटा गोदीपासून दोन-एक किलोमीटर्स अंतरावरच्या घरांची छपरं फाडून घरात पडल्याचं आवर्जून सांगितली जाते. अगदी, त्या दिवशी सोन्याचा पाऊसपडला, असं त्याचं वर्णन केलं जातं. पण ते अतिशोयाक्त वर्णन असावं. १४ एप्रिल १९४४ रोजी स्फोट झाल्यापासूनच्या पुढच्या चार दिवसांच्या मराठी वर्तमानपत्रांतील बातम्यांमध्ये, केवळ एक बातमी पारशाच्या घरात पडलेल्या सोन्यासंबंधातली आहे. ती वर दिली आहे.

पेटत्या कापसाचा आणि तप्त लोखंडाच्या तुकड्यांचा वर्षाव अनेक इमारतींवर झाल्याने, त्या अग्निवर्षावात अनेक चाळींना आगी लागून मुंबईकर दगावल्याच्या अथवा बेघर मात्र अनेक बातम्या आहेत.सोन्याच्या साठा होता तो जहाजावरच्या दोननंबरच्या कप्प्यात अगदी तळाला. त्यावर स्फोटकं, स्फोटकांवर कापूस आणि त्याच्यावर भंगारचे तुकडे, अशी रचना होती. शिवाय सोनं प्रथम लाकडांच्या पेट्यांमध्ये भरून, त्या पेट्या मजबूत पोलादी आवरणात सील बंद होतं. त्यामुळे स्फोट झाल्यावर काही पेट्या उघडल्या जाऊन काही सोनं उडालंही असेल, पण बाकी सोनं त्याच्या वर ठेवलेल्या स्फोटकांच्या धमाक्यामुळे समुद्राच्या तळात खोलवर रुतून पडलं असण्याचीच शक्यता जास्त.

त्याला पुष्टी देणारी बातमी सन २००९ च्या ‘The Daily Mirror’ ह्या मुंबईच्या वृत्तपत्रात आलेली होती. फेब्रुवारी महिन्यात व्हिक्टोरीया डॉकमधील गाळ काढण्याचं काम सुरु असताना, गाळ काढाणाऱ्या कमालखान नांवाच्या एका कामगाराला, त्याने उपसलेल्या गाळात १०० आणि ५० ग्राम वजनाची सोन्याची दोन बिस्कीटं सापडली होती. ती त्यांने पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्या बिस्कीटांची तपासणी केली असता, ती १९४४ च्या स्फोटतलीअसल्याचं सिद्ध झालं होतं.

‘मुंबई मिरर’मधील बातमी..

दुसरा पुरावा माझे मित्र व सामाजिक कार्यकर्ते श्री. जगदीश आडवीरकर यांच्याकडे आहे. त्यांचे वडील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला होते. सन १९८० मध्ये बंदारातला गाळ काढताना, त्या गाळात त्यांना १० किलो वजनाची सोन्याची वीट सापडली होती. सदर वीट त्यांनी सरकारच्या ताब्यात दिल्यावर त्यांना रोख १ हजार रुपयांचं बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, त्याचा फोटो सोबत जोडला आहे.

सदानंद मारुती आडविरकर यांनी, त्यांना समुद्रात मिळालेली सोन्याची वीट पोर्ट ट्र्स्ट अधिकाऱ्यींच्या ताब्यात दिल्यानंतर, पोर्ट टर्सकडून त्यांना मिळालेलं प्रमाणपत्र..

कुणास ठाऊक, या स्फोटातलं असं कित्येक किलो सोनं व्हिक्टोरीया आणि प्रिन्सेस डॉकच्यासमुद्रात रुतून बसलेलं असेल. काही न फुटलेले बॉम्ब्सही असतील, हे ही कुणास ठाऊक..!

उपसंहार –

एस. एस. फोर्ट स्टायकीन हे जहाज मुंबई बंदरात आल्यावर झालेल्या चुका टाळल्या असत्या तर, तर हा स्फोट झाला नसता, असा निष्कर्ष ह्या स्फोटासंबंधी लिखाण करणाऱ्या काही लोकांनी काढलेला आहे. स्फोटकं आणि ज्वालाग्राही साहित्य वाहून नेणाऱ्या जहाजांवर ‘रेड फ्लॅग’ लावायला हवा असा दंडक आहे. ह्या जाह्जावर तो लावलेला नव्हता. हा झेंडा लावलेला असता तर, ह्या जहाजावर स्फोटकं आहेत, हे सर्वाना समजले असते. विशेषत: बोटीतून समान उतरवणाऱ्या हमालांना, त्यातील स्फोटकं तातडीने उतरवून घेण्याची तातडी लक्षात येऊन त्यांनी ती त्वरित उतरवून घेण्यास सुरुवात केली असती. तसंच जहाजातून धूर येताना दिसताच, परिसरातले सगळे सावध झाले असते आणि आजूबाजूच्या जहाजांना खोल समुद्रात नेता आले असते, आणि त्यांचं नुकसान टाळता आलं असतं.

बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ याने प्रथम स्फोटकं उतरवून घ्यावीत असं संबंधित अधिकाऱ्यांना परोपरीने सांगूनही, त्याच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं, ही दुसरी चूक झाली होती. स्फोटकं उतरवून घेण्यासाठी लागणाऱ्या लहान बोटी त्याला तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. बंदर अधिकाऱ्यांकी कॅप्टनच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर, स्फोटकं वेळीच उतरवून घेता आली असती आणि मग कापसाच्या गासड्यांना आग जरी लागली असती, तरी स्फोट झाला नसता.

जहाजाचा चीफ इंजिनिअर अलेक्सला इंजिन दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात आली होती. वासाताविक जहाजावरील स्फोटकं उतरवून होईपर्यंत जहाजाचं इंजिन खोलण्याची परवानगी देता कामा नये होती. जर बोतीच्म इंजिन कार्यरत असलं असतं तर, बोटीतून धूर येताना दिसताच, बोट दूर समुद्रात सहज नेता आली असती आणि जरी स्फोट झाला असता तरी, त्यामुळे झालेली वित्त आणि जीवितहानी टाळता आली असती किंवा तिची तीव्रता बरीच क्षीण करता आली असती. ही चौथी चूक झाली होती.

बोटीवर समान ठेवण्यासाठी असलेला कप्पा क्रमांक एक आणि दोन यांना डेकवर जोडणारा एक चिंचोळा मार्ग होता. हा मार्ग तसा जा-ये करण्यासाठी फारसा वापरात नव्हता. बोटीवर असणाऱ्या किंवा बंदरात थांबल्यानंतर कुणाला सिगारेट ओढण्याची तलफ आल्यास, ती गपजूप भागवण्यासाठी हा आडोसा अतिशय सोयीचा होता. याची कॅप्टन नायस्मिथ आणि बोटीवरच्या इतर अधिकाऱ्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी त्या गँगवेमध्ये ‘No Sominkg’, ‘Smoking Strictly Prohibited’ अशी मोठ्या अक्षरातली पोस्टर लावली असावीत. परंतु, त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून, बंदरात बोट उभी असताना, सामान उतरवण्यासाठी आलेल्यांपैकी कुणीतरी दुपारच्या जेवनानंतर झुरका मारायची तल्लफ आल्यावर तिथे सिगरेट/विडी शिलगावली असावी आणि विडी ओढून झाल्यानंतर पेटती विडी चुकून तिथेच टाकली असावी. त्यामुळे कापसाच्या एखाद्या गासाडीने पेट घेतला असावा आणि मग पुढचा सर्व अनर्थ ओढवला असावा, असा अंदाज चौकशीत काढला गेला. तो बरोबर असेलच असं नाही. परंतु, तसं झालं असल्यास, जहाजावर असलेला तो अंधारा आडोसा ही तिसरी आणि सर्वात गंभिर चूक होती..

(भाग तिसरा व शेवटचा. तीन लेखांची मालिका इथे लमाप्त झाली)

– नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

महत्वाची टीप-

तीन भागांच्या या लेख मालिकेतील पहिल्या भागाच्या अगदी सुरुवातील जो ‘सिमला वेधशाळेचा’ उल्लेख आहे, ती वेध शाळा प्रत्यक्षात सिमला इथली नसून, पुणे इथली असावी. ‘पुणे वेधशाळा’ या नांवाने ती आपल्याला माहित आहे.

सिमला ही ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असल्याने, बऱ्याच सरकारी संस्था सिमला इथुनही कार्यरत होत्या. वेधशाळाही त्यापैकीच एक. ही वेधशाळा दिनांक २० जुलै १९२८ रोजी पुणे येथे हलवण्यात आली होती. ही वेधशाळा सिमल्याहून पुणे येथे हलवलेली असल्याने, तिला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हणत. किंबहुना ती सिमला ऑफिस या नांवानेच पुणेकरांना माहित होती/आहे. फोट झाला त्या वेळी सिमला येथे वेधशाळा कार्यान्वित नव्हती.

सदरची माहिती लेख लिहिल्यानंतर माझे स्नेही व महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी श्री. अशोक नायगांवकर यांनी माझ्या नजरेस आणून दिली आणि ‘सिमला ऑफिस’संबंधीची जास्तीची माहिती माझे पुणेस्थित स्नेही व मुंबई शहरावर नितांत प्रेम करणारे श्री. संभाजी भोसले यांनी पुरवली.

सदरची माहिती नंतर समजल्याने, ती मूळ लेखात न देता ‘महत्वाची टीप’ म्हणून देत आहे.

संदर्भ –

१. सदरचा लेख, मुख्यत्वेकरून, वॉरेन अर्मस्ट्रॉंग यांनी लिहिलेल्या ‘Fire Down Below’ या इंग्रजी पुस्तकातल्या ‘Fort Stikin’ या लेखावर आधारलेला आहे.

२.     लेख ‘Anatomy of a Disaster; The Bombay Docks Exploision’, लेखक – मायकेल महोनी मायकेल महोनी यांचे वडील डेनिस महोनी स्फोटाच्या दिवशी, स्फोट झालेल्या फोर्ट स्टायकिन जहाजाच्या शेजारी काही अंतरावर नांगरलेल्या S. S. Tinombo या मालवाहू जहाजावर ‘गनर’ म्हणून नोकरीला होते. स्फोट झाल्या दिवशी ते त्या जहाजावर हजार होते आणि सुदैवाने त्या अपघातातून वाचले होते. त्यांनी सांगितलेल्या आठवणींवरून मायकेल महोनी यांनी सदरचा लेख लिहिला आहे. 

३.     Dock Explosion in Bombay; How 66 Brave Fire Fighters Died Battling the Flames – लेखिका अंगारिका गोगोई. 

४.     ‘Major Industrial Disasters in India’ संपादक- प्रार्थना त्रिवेदी, दीपक पुरोहित आणि अॅनी सोजू. प्रकाशित – National Institute of Occupational Health, Meghani Nagar, Ahmedabad. 

५. वर्तमानपत्र ‘नवाकाळ’ची कात्रणं, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या, दादर येथील संदर्भ शाखेच्या सहकार्याने प्राप्त झाली.

मुंबईला अनेक जण स्वप्नांचं शहर म्हणतात, पण या मुंबईच्या गर्भात एक मोठा आणि प्राचीन इतिहास दडलेला आहे, जो आजपर्यंत मुंबईकरांपर्यंत पोहोचलेला नाही. चला तर मग मुंबईच्या इतिहासाची सफर करूया मुंबई शहर अभ्यासक नितीन साळुंखे यांच्यासोबत एका नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये !
अशी घडली मुंबई

संपूर्ण व्हिडिओ येत आहे ०१ मार्च २०२४ !

YouTube

Facebook

Instagram

गाजावाजाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा,आणि जास्तीत जास्त शेअर करा.

मुंबईत अवतरलेली पहिली मोटर गाडी..

मुंबईत अवतरलेली पहिली मोटर कार..

आज २५ फेब्रुवारी.

बरोबर १२८ वर्षांपूर्वी,
म्हणजे मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी १८९६ रोजी,
आजच्या अत्याधुनिक मोटारींची खऱ्या अर्थाने पूर्वज म्हणता येईल अशी मोटर कार फोर्टमधल्या शो-रुम मध्ये प्रदर्शित करण्यात आली.

त्या काळात या गाडीचं वर्णन, पुरुषांना वेड लावणाऱ्या नवीन ‘स्त्री’चा मुंबईत उदय झाला आहे, असं केलं गेलं होतं.

-नितीन साळुंखे

वाचायलाच हवं असं पुस्तक..!

वाचायलाच हवं असं पुस्तक..!

‘सिनेमा पाहाणारा माणूस’ – अशोक राणे

अशोक राणे यांनी गेल्या ५० वर्षात देशविदेशात भरपूर प्रवास केला आहे. तरूणपणी जेव्हा मुंबईतल्या लोकलचा पास काढायची बोंब होती, तेव्हा त्यांनी रेल्वेचं सर्क्युलर तिकिट काढून (तेव्हा तोी२७५/- रूपये होती) देशभर भटकंती करण्याचा प्रस्ताव मित्रांसमोर ठेवला. त्यांच्यासकट कुणाकडेच एवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी सुधारीत प्रस्ताव मांडला – ट्रक्सवाल्यांकडून फुकट लिफ्ट मागत भटकायचं”. मित्रांनी चेष्टा केली. पण यांनी पुढचंच सुचवलं की, मुंबई ते रोम विमानाचं स्वस्त तिकिट मिळतं ते घ्यायचं आणि रोमपासून सुरू करून सर्व युरोपियन देशात हिंडायचं. मित्र म्हणाले, हा वेडा आहे.

पण पुढे सिनेमाचं बोट धरून हा जगभर इतका हिंडला की, अभिनेता विजय कदम ज्याला त्याला सांगू लागला की, “अधुनमधून भारतात येण्यासाठी याच्याकडे भारताचा व्हिसा आहे” म्हणून.. ! विजय तेंडुलकरांनी तर याला एकदा विचारलंच की, “तुझी बॅग उचलायला कुणी सोबत लागत नाही का?”.

अशोक राणे जगभर हिंडले, पण त्यांनी क्वचितच टुरिस्ट पोईंटस पाहिले असतील. त्यांनी जे जग पाहिलं ते विलक्षण आहे. त्यांनी एकदा लिहिलं होतं की, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या डिक्शनरीतून ‘महत्वाकांक्षा’ हा शब्द काढून टाकला. त्यांचा एक पत्रकार मित्र अस्वस्थ झाला. अशोक राणे यांनी त्याला सांगितलं की, तशी एक महत्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे जगातल्या एकूण एक देशात जायचं आहे आणि तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलायचं आहे…

…’ सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक लिहिणारे राणे, ‘जग पाहणारा माणूस ‘ हे पुस्तक कधी लिहिताहेत याची आता प्रतिक्षा आहे..!

पुस्तक -‘सिनेमा पाहाणारा माणूस’ (दुसरी आवृत्ती)
२०२१ सालचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेतं पुस्तक.

लेखक – अशोक राणे

प्रकाशक -संधिकाल प्रकाशन.

किंमत – रु. 1,000/- •
सवलत मुल्य – र. 800/-+पोस्टेज

पुस्तकासाठी नितीन साळुंखे यांच्याशी 9321811091* या क्रमांकावर संपर्क साधावा.

-नितीन साळुंखे.

‘बदलता भारत’ – आपण वाचायलाच हवा आणि संग्रहीही असायला हवा असा एक महत्वाचा ग्रंथ-

आपण वाचायलाच हवा आणि संग्रहीही असायला हवा असा एक महत्वाचा ग्रंथ-

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचं आणि पैलूंचं परखड विश्लेषण करणारा आणि भारताच्या भविष्यातील वाटतालीची निश्चित दिशा दाखवणारा द्विखंडात्मक महाग्रंथ.

‘बदलता भारत’

साठ नामवंत लेखकांच्या निरिक्षण आणि चिंतनातून कागदावर उतरलेली साठ विषयांची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी.

संपादक – दत्ता देसाई.

प्रकाशक- मनोविकास प्रकाशन, पुणे.

दोन खंड. एकूण पृष्ठसंख्या- १२००.

किंमत -रु. ३,०००/- (रुपये तीन हजार मात्र)
प्रकाशनपूर्व नोदणी -दि. १८ जानेवारी २०२३ पर्यंत.

सवलतीची किंमत- १,८००/- (रुपये एक हजार आठशे) अधिक रु.१३०/- पोस्टेज/कुरीअर शुल्क.

महत्वाचं –
दि. १८ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदणी करणारांना दि. २६ जानेवारीपासून ग्रंथ उपलब्ध होत जाईल. १८ डिसेंबर नंतर नोंदणी करणारांना १८ फेब्रुवारी २०२३ नंतर ग्रंथ मिळेल.

किंमत अदा करण्यासाठी-
सदर ग्रंथाची नोंदणी तुम्ही माझ्याकडेही करु शकता.
9321811091 (नितीन साळुंखे) या क्रंमाकावर आपण आवश्यक ती रक्कम जमा करु शकता.

किंवा

http://www.manovikasprakashan.com या संकेतस्थळावरही नोंदणी करू शकता.

-नितीन साळुंखे

‘अज्ञात मुंबई’

मित्रांनो नमस्कार

‘मनोविकास प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशित केलेल्या, माझ्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकाला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

हे पुस्तक आता खालील ठिकाणी उपलब्ध आहे-

१. मनोविकास बुक सेंटर, आकाशवाणी आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई-३२.

२. मॅजेस्टीक ग्रंथ दालन, शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई -२८.

३. आयडीयल बुक डेपो- दादर पश्चिम

४. मॅजेस्टीक बुक डेपो – राम मारुती रोड, भवानी बिल्डींग, ठाणे – ४०० ६०२.

मुंबई-ठाणे येथील वरील सर्व दुकानांत व महाराष्ट्रातील पुस्तकांच्या सर्व प्रमूख दुकानांतून हे पुस्तक उपलब्ध आहे.

तसेच, http://www.amazon.in आणि http://www.manovikasprakashan.com या संकेत स्थळांवरुनही आपण हे पुस्तक मागवू शकता.

माझ्याकडेही काही प्रती आहेत. 93218 11091 या क्रमांकावर संपर्क साधल्यास माझ्याकडुनही तुम्हाला हे पुस्तक मिळू शकेल.

धन्यवाद,

-नितीन साळुंखे

“अज्ञात मुंबई”, लेखक – नितीन साळुंखे- पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय.

मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची रंजक तितकीच हटके कहाणी सांगणारं पुस्तक-

मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची रंजक तितकीच हटके कहाणी सांगणारं पुस्तक-

“अज्ञात मुंबई”
लेखक – नितीन साळुंखे

प्रकाशक -मनोविकास प्रकाशन, पुणे.

किंमत– रु. 475/-

प्रकाशनपूर्व सवलत -25 %

सवलत मूल्य – रु. 356 + पोस्टेज रु.70
(एकूण रु. 426/-)

(एकापेक्षा जास्त प्रती असल्यास पोस्टेज खर्चात त्याप्रमाणे वाढ होईल)

आजच नोंदणी करा

सदर पुस्तकाची नोंदणी आपण खालील प्रमाणे करू शकता-

9321811091 या क्रमांकावर पोस्टेज खर्चासह सवलत मूल्य ‘गुगल पे’ करा,

किंवा –

NITIN ANANT SALUNKE
Axis Bank Ltd.,
Dadar East Br., Mumbai 14,
SB A/C 124010100345477
IFSC CODE – UTIB0000124
या बँक खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम आपण जमा करून पुस्तकाची नोंदणी करा.

मात्र आपला पत्ता, फोन नंबर आणि पैसे जमा झाल्याची पावती salunkesnitin@gmail.com वर पाठवावी.

मेलच्या विषयाच्या जागी (Sub field मधे) “पुस्तक नोंदणी- आपले नांव’ असे स्पष्ट लिहावं.

-नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com