एकमेकांपासून दूर असलेल्या, एकमेकाला प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या, भेटण्याची शक्यता धुसर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये एका नात्याचा बंध निर्माण होतो त्याला काय नांव द्यावं कळत नाही..काहीतरी गुढ, अनामिक, हवसं वाटणारं आणि हुरहूर लावणारं घडत असतं हे नक्की..
हे नातं फक्त त्या दोघांनाच ठाऊक असतं..आपापल्या ठिकाणी लौकीक बंधनात असूनही त्यांना या अलौकीक नात्याची अनावर ओढ लागते..इथं वय, जात, भाषा आदी बेड्या नसतातंच.. एकमेकांच्या समोर नसूनही एकमेकाचं सुख-दु:ख, राग-लोभ या भावनांची अचूक जाणीव कशी काय होत असावी हे ही कोडंच आहे..इथे एकमेकांचे सुक्ष्म मन-देह एकमेकांना त्यांच्याही नकळत भेटत असावेत काय?
