छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ३ एप्रिल १६८० या दिवशी झालं.
ही बातमी पुढच्या काही दिवसांतच ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या, सुरत येथील वखारीतल्या अधिकाऱ्यांच्या कानावर गेली.
त्यांनी त्या बातमीवर विश्वास ठेवण्याचं नाकारलं.
कदाचित, हा देखील शिवाजीच्या गनिमी काव्याचाच भाग असेल, असं त्यांना वाटलं असावं.
ते म्हणाले,
ज्या दिवशी शिवाजीच्या पराक्रमाच्या बातम्या येणं बंद होतील, तेंव्हाच त्यांचा मृत्यू झाला, असं आम्ही समजू..!
मित्रांनो, ह्यातून बोध एवढाच घ्यायचा की,
महाराज अजुनही जिवंत आहेत.
वर्ष ३४० उलटून गेली तरी, त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या अजुनही येतातच आहेत..
आणि त्या येतायत, तो पर्यंत महाराज जिवंतच आहेत..
पण, ते आता मात्र मरणपंथाला लागलेत..
आपणच त्यांची हत्या करत आहोत..
महाराजांच्या (फक्त) पराक्रमाच्या गाथा गाणारे आपण,
त्यांच्या न्यायप्रियतेच्या,
त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या
आणि त्यांच्या रयत सुखाच्या कल्पना
खरंच प्रत्यक्षात आणतोय का किंवा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय का?
तसं करत नसल्यास
त्यांचा वारसा सांगणारे आपण
महाराजांच्या मृत्युस कारणीभूत ठरत आहोत..
आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आत्मपरिक्षण करणं खूप गरजेचं आहे..
अन्यथा, शिवजयंती हा फक्त एक ‘इव्हेन्ट’ बनून राहील,
आणि महाराजांना मारल्याचं पातक आपल्याला लागेल…!
महाराज त्यांच्या कितीतरी फुटी उंचं पुतळ्यात नाहीत,
राजकीय पक्षांच्या कार्यालयात तर नाहीच नाहीत..
ते माझ्यात आहेत.
तुमच्यात आहेत.
त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर,
त्यांच्या आदर्शावर चालणं आवश्यक आहे..
आपल्या वागणुकीतून महाराज जिवंत राहायला हवेत..
महाराजांचा वारसा सांगणारे आपण, त्यांच्या जिवंत प्रतिमा आहोत, त्या प्रतिमांना तडा जाईल असं वागणं आपल्याकडून चुकुनही होता कामा नये, हे सदोतीत ध्यानात ठेवायला हवं..
ही जबाबदारी माझी, तुमची आणि आपल्या सर्वांचीच आहे…
